कशासाठी अणि जगावे कसे मी ? |
विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी ||
जगू पांग फेडावया मायभुचे |
आम्ही मार्ग चालू जीजाऊ सुताचे ||
देहास मानूनी जगा नित पायपोस |
झुन्झा अखंड करण्या आपूला स्वदेश ||
होऊ नका चुकुर हे ह्रुद्गत कठुनी |
संदेश अन्तिम दिला शिवभुपतीनी ||
उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली |
अशाना करी लागती ना मशाली ||
रवि नित्य तेवे विना तेलवात |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||
संभाजी मंत्र तद्वत उरी ज्या शिवाजी |
मारेल मृत्यु वरही रणी नित्य बाजी ||
हे हिंदुराष्ट्र करण्या रविवत ज्वलंत |
हे बीजमंत्र भिनवू मनशोणितात ||
माघार ठावी न कधी आम्ही मातृभक्त |
राष्ट्रार्थ जीवन जगू शतधा विरक्त ||
चित्तात साठवू सदा शिवभुपतीस |
हे संकेतस्थळ माझ्या आवडत्या कवितांचे संग्रहीत व वर्गीकॄत स्वरूप आहे.. ह्यातील कविता माझ्या नाहीत ..
Tuesday, 12 May 2009
Tuesday, 5 May 2009
आलाप
मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!
कुठेतरी मी उभाच होतो...कुठेतरी दैव नेत होते!
वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही!
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?
कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करु तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!
असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!
जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!
मला विचारु नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणा-या हवेत होते!
कवी : सुरेश भट.
Subscribe to:
Posts (Atom)